वाघोतील कष्टकरी अतिक्रमण धारकांचा वनवास संपणार- उपायुक्त मनपा माधव जगताप
सुनील भंडारे पाटील
वाघोलीतील वाघेश्वरनगर, सुयोगनगर, बुरुंजवाडी, गाडीतळवस्ती व ढोमखेलरोड वस्ती बाबत अँड. बी. एम. रेगे यांचे नेतृत्वाखाली झालेल्या पंधरा दिवसाच्या बेमुदत अन्न त्याग सत्याग्रहानंतर जिल्हाधिकारी प्रशांत डुड्डी व मनपा आयुक्त नवल किशोर राम यांचे बरोबर झालेल्या झालेल्या बैठकी नंतर आज मनपा उपायुक्त माधव जगताप यांचे बरोबर दगडखाण कामगारांच्या शिष्टमंडळी बरोबर क्षेत्रीय कार्यालय ढोले पाटील रोड येथे पार पडली.
गेली चाळीस ते पन्नास वर्षाहून अधिक काळ निवास प्रयोजनासाठी राहत असणारे वाघोलीतील अतिक्रमणधारक व अठरा वर्षापासून रामवाडी नगर रस्ता व व्ही. आय.पी. एअर पोर्ट रोड रुंदीकरणात बाधित कुटुंबाचा हक्काच्या घरासाठीचा वनवास कायम स्वरूपी संपुष्टात येण्याचे ठोस आश्वासन पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप यांनी दिले.
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत रामवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सह आयुक्त कैलास केंद्रे, वरिष्ठ अभियंता अशोक सांगळे व बांधकाम विभागाचे अधिकारी,
दगडखाण कामगार विकास परिषद महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बी एम रेगे यांनी चारी वस्त्यांतील कुदुंब धारकांची आकडेवारी सांगितली. प्रत्येक कुंटुंबाला न्याय मिळावा, कोणावरही अन्याय होऊ नये असा पारदर्शक सर्वे संतुलन संस्थेने केला असून आवश्यक असल्यास मनपाने लाची पडताळणी करावी असे माहिती संतुलन संस्थेच्या संचालिका अँड. पल्लवी रेगे यांनी दिली.
पुढील दोन ते तीन दिवसात सर्व महितीसह प्रस्ताव आयुक्ता मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठवण्याची जबाबदारी रामवाडी क्षेत्रीय कार्याकयाचे अधिकारी कैलास केंद्रे व अशोक सांगळे यांचेवर सोपवली असून सिद्धार्थ नगर रस्ता बाधितांचे काम तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी वंदनाताई भुजबळ, अंबादास साळुंखे, कांताबाई पवार, माणिक विटकर, नंदकुमार जाधव, सुरेश यादव, अनिल शिंदे, ईश्वर कळसाईत, जनाबाई चौगुले, प्यारेलाल जाधव, शिवाजी पात्रे, सचिन मंजुळे व रघुवीर क्रांती आदी उपस्थित होते
