यावेळी मोरेश्वर काळे,लोणी काळभोर चे माजी सरपंच अण्णासाहेब काळभोर,रमेश कुंजीर,विठ्ठल काळे,साहेबराव बांगर,रमेश काळे,सुखराज कुंजीर,गिरीश दांगट,भाऊसाहेब आव्हाले,अॅड अभय दांगट,साहेबराव दांगट आदी सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.
साधारणपणे 1970 ते 2011 पर्यंत हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होता चार तालुक्यातील बावीस हजार सभासद व जवळपास एक लाख लोकसंख्या या कारखान्यावर उदरनिर्वाह करत होती अचानकपणे कारखाना बंद पडल्यामुळे यावर अवलंबून असलेल्या सर्व कुटुंबांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आगामी काळात संचालक पदाची निवडणूक घेऊन सर्व संचालक मिळून हा कारखाना सुरू झाल्यास इथेनॉल प्रकल्प ही काळाची गरज असून इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करून हा कारखाना नफ्यात आणला जाईल, प्रामाणिक संचालक मंडळ सर्व शेतकरी बांधवांना पाठीशी घेऊन काम करेल,यशवंत कारखाना नावारूपास आणेल असा विश्वास यावेळी पांडुरंग काळे,पै.दत्ताआबा काळे आणि मोरेश्वर काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.


