ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार केशरबाई अशोकराव निकम (वय 64) या जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने चालत असताना मंगळवार ता 9 रात्री 10:20 मी नि वेगात येणाऱ्या थार महिंद्रा गाडीने त्यांना जोरदार धडक दिल्याने अपघाताचे स्वरूप अतिशय गंभीर झाले असून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, कोरेगाव भीमा वडू बुद्रुक रस्त्यावर रस्त्याचे काम नवीन झाले असून वाहनांच्या वेगावर मर्यादा नसल्याने लहान मोठे अपघात होऊ लागले आहेत, तातडीने या मार्गावर गतिरोधक बसवण्याची विनंती तसेच मागणी ग्रामस्थ करत आहेत, रस्त्याच्या कडेच्या बाजूने शतपावली करणाऱ्या महिलेला अतिशय वाईट पद्धतीने ठार गाडीने धडक मारल्याने गंभीर अपघात झाल्याने या महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे,
