सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
महाराष्ट्रामध्ये यावर्षीही पावासाने धुमाकूळ घातला असून परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे बारामती तालुक्यातील मांगोबाचीवाडी व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे येथील शेतकरी नंदू रतन शिंदे यांनी सांगितले की या शेतामध्ये कांदा पिक लावलेले होते अत्ती झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे याबाबत नुकसानेचे पंचनामे करुन शासनाने शेतकऱ्यांना मदत करावे,
शेतकरी कांदा पिक घेवून आर्थिक दृष्ट्या मजबूत होण्याचा प्रयत्न करतात परंतू यावर्षी झालेल्या भरपूर व अत्ती पावसामुळे कांद्याचे पिक हातातून गेल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याची अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

