श्रीक्षेत्र वाडेबोल्हाई तसेच केसनंद गावचा परिसर म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला, झाडे झुडपे, प्रशस्त हिरवळीचा गालिचा, दक्षिण बाजूला असलेली डोंगररांग, पुरातन काळापासून या परिसरातील सौंदर्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, परंतु प्लॉटिंग व्यवसायिकांनी परवानगी नसताना कायद्याची पळवाट शोधत झाडे झुडपे, टेकड्या नष्ट केलेल्या आहेत, प्लॉटिंग व्यवसायिक अगदी डोंगराच्या पायथ्याला भिडलेले आहेत डोंगराचा पायथा कोरण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे, एकंदरीत येथील निसर्ग सौंदर्याला प्लॉटिंग व्यवसायिकाकडून गालबोट लागले असून, या व्यवसायिकांना नेमकं कोणाचे पाठबळ आहे, याविषयीची चर्चा परिसरात रंगू लागली आहे, राजरोसपणे प्लॉटिंग व्यवसायिकांचा अंधाधुंद कारभार महसूल खात्याचे अधिकारी मात्र उघड्या डोळ्याने पाहत आहेत, अवैध चाललेले या व्यवसायावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत,

