March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
      घराघरात मुल्यशिक्षण पोहचून पुंडलीक व श्रावण बाळं निर्माण व्हावीत आणि निर्व्यसनी आदर्श सुसंस्कारीत नवपिढी तयार व्हावी त्यासाठीच या महासत्संग मेळाव्याचे आयोजन आहे , असे प्रतिपादन सद्गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांनी मोशी येथील मेळाव्यात उपस्थीत लाखांवर भाविकांना मार्गदर्शन करताना केले .  

 यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे , माजी आमदार विजय शिवतारे , अश्विनी जगताप , सुनेत्रा पवार, देहूचे हभप नितीन मोरे, प्रविण तरडे , नगरसेवक शंकर जगताप , दिपक हारके , प्रो. ईस्ताद अहमद व देशभरातील ४८० श्री समर्थ सेवा केंद्रातून आलेले लाखावर सेवेकरी भावीक उपस्थीत होते . मोशी सेवा केंद्राच्या विद्यार्थ्यांचे स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली . त्यानंतर अथव शिर्ष कोटी वेदपठण झाले . सर्व मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व ज्ञानोबा तुकोबारायांचे प्रतिमेस पुष्पहार घालून सर्व मान्यवरांचा सत्कार करणेत आला . मोशी केंद्राचे सतीष गोटे यांनी प्रास्ताविकात ३५० कंपन्या बोलावून १२००० जणाना नोकऱ्या देण्यात आल्याचे सांगीतले . प्रो. ईस्ताद अहमद यांनी जोषपूर्ण भाषणात सर्व धर्म समभावाची भावना व्यक्त करत टाळ्या मिळविल्या . चंद्रकांत पाटील , आढळराव पाटील, अंबादास दानवे यांनी गुरु माऊली आण्णांचे कार्या पासून प्रेरणा मिळते असे सांगीतले .

    मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रचंड गर्दीने भारावून गेल्याचे सांगत आम्हाला राजकीय सभांना ५ हजार माणसं जमवताना घाम फुटतो पण इथे हजारो गावांतून लाखो भाविक स्वखर्चाने आलेत हे पाहून या महा सत्संग सोहळ्याचे महात्म महानच आहे व आमचे सारख्याना प्रेरक आहे असे प्रशंसोद्गार काढले . या सत्संगासाठी सणसवाडी – शिक्रा पुर स्वामी समर्थ सेवा केंद्रातून ५० गाड्यांतून ३५०० वर सेवेकरी भावीक उपस्थीत होते .