जातीयवाद ही आपल्या देशाला लागलेली एक कीड आहे, त्याचा परिणाम सद्यस्थितीत कायदा सुव्यवस्थेवर होत असून, जातीय वादामुळे होणाऱ्या दंगलीमुळे , अंतर्गत जाती जातीमध्ये होणाऱ्या कुरखड्यांमुळे देशांतर्गत शांतता नष्ट होत आहे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यकारभारासाठी अत्यंत सुटसुटीत अशी घटना दिली, त्यांच्या विचारानुसार समाजातील उच्च – कनिष्ठ थर एका लेवलला येण्यासाठी कायदे व्यवस्था केली, परंतु वेळेनुसार जे बदल पाहिजे ते न झाल्याने देशांतर्गत जाती-जमातींमध्ये आता दरी पडू लागली आहे, बरेचसे राजकारणी लोकं जाती जातीमध्ये मतदानाचा प्रवाह वळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने भांडण लावत आहेत, त्यामुळे याचा परिणाम खूप मोठा होत असून, समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होणे, दंगली घडणे असे विपरीत परिणाम होऊ लागले आहेत, याचा फार मोठा परिणाम कायदे सुव्यवस्था, शांततेवर होत आहे,
आपला भारत देश असा आहे की, शेकडो जाती जमातीचे लोक राहतात, गुण्या गोविंदाने राहत असताना नागरिकांची काही अपेक्षा नाही, परंतु काही मूठभर राजकारणी लोक स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी जातीचा फायदा उचलतात, शिवाय आरक्षण मुळे हुशार आणि गुणवत्ता असणाऱ्या मुलांवर सर्वच क्षेत्रांमध्ये अन्याय होत असल्यामुळे, हा अन्याय थांबवण्यासाठी, कायदे सुव्यवस्था तसेच देशामध्ये, राज्यामध्ये आता समान नागरी कायद्याची गरज आहे, असे मत सर्व स्तरातील नागरिक व्यक्त करत आहेत,


