March 30, 2026
सुनिल भंडारे पाटील 
         एका व्हिडीयोत मुलांबरोबर हरीण नाचतानाचा प्रसंग प्रचंड व्हायरल झाला . त्या हरणाकडून आजच्या युवापिढी व मुलामुलींनी भजनातील आनंद व सात्वीक नाचणे गाणे शिकावे अशी भावना हभप ज्ञानेश्वर मिडगुले यांनी हरीनाम सप्ताह मंडळाकडे व्यक्त केली . 

   या व्हिडीओतील हरीण पहा भक्ती गिताच्या अभंगाचे तालावर नाचणाऱ्या मुलांच्या शेजारी त्यांचे प्रमानेच बम्हानंदाने नाचत भजनाचा आनंद घेत आहे. अलीकडील  नवीन पिढी पहा भजन कीर्तन गायन हरीपाठ या ठिकाणी एकतर जातच नाही आणि त्यांचे व्यस्त पालकही आवर्जुन नेत नाहीत . म्हणून जे चांगलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही .अभंग , भावगीत ,भारूड , गौळण , श्लोक , ओव्या, दोहे , भक्तीगीते यांच्या चाली ह्या डीजे ,आर्केस्ट्रा वा सिनेमाच्या गाण्यांपेक्षाही कितीतरी चांगल्या असतात , पण त्या मुलांच्या वा विद्यार्थ्यांच्या कानावर पडत नाहीत कारणे त्यांना अभंगाची गोडी निर्माण होत नाही .खरंतर डीजे ऑर्केस्ट्राचं गाणं फार तर वर्षभर टिकतं ,पुढील वर्षी ते गाणं दिसत नाही दुसरे नवीन गाणे वाजते .परंतु ७०० वर्षानंतरही संतांचे अभंग प्रत्येक गावोगावी काकडा , भजन ,प्रवचन -कीर्तन या ठिकाणी  मोठ्या भक्तीभावाने गायले जातात . सुंदर ते ध्यान’, अवघाची संसार ‘ , इवलेसे रोप, कांदा मुळा भाजी हे सारे अभंग आजही नित्य नवे ताजेतवाणे वाटतात . जनाबाई मिराबाई , मुक्ताबाई बहिणाबाई आदी संताचे अभंग शालेय शिक्षणात अभ्यासक्रमात ही असतात पण ते विद्यार्थ्यांच्या डोक्यात वा तोंडात बसत नाहीत . पण ती डीजेची  शांताबाई मात्र दुरवरून दणकली की टंगड्या उडवीत ही बाळं लुंगी डान्स करु लागतात . आकेस्ट्रात नुसता         ‘ मुंगळा मुंगळा ‘ हे गाणं लागलं की कार्टी मुंगळ्या सारखी नाचतात . हा मुंगळा वा ती शांताबाई फक्त एकच वर्ष टिकली , पुढच्या वर्षी यांचा ‘ आला बाबुराव ! यांना ज्ञानदेव एकनाथ नामदेव तुकाराम आठवत नाहीत , ज्यांच्या अभंग रचना प्राथमिक शाळेपासून कॉलेज पर्यत अभ्यासक्रमात असतात . अगदी इंग्लीश मेडीयम लाही ज्ञानदेवांचा ‘ पैल तो गे काऊ कोकताहे ‘ , तुकाराम महाराजांचा ‘ जे का रंजले गांजले ‘ , सावता महाराजांचा ‘कांदा मुळा भाजी ‘ आदी अंभग कॉलेज पर्यंत अभ्यासार्थ असतात . पण छात्र ते फक्त उतरे लिहून पास होण्यासाठी असतात एवढेच समजतात .

     

अभंग शब्दाची फोड पहा, अ -भंग म्हणजे कधीही न भंगणारे ! ज्याचे आयुष्यात चार दोन अभंग पाठ असतील आणी त्यातील एका अभंगाचा अन्वयार्थ आचरणात आणला तरी हे जिवण कधीच भंग पावणार नाही . संताच्या विचारात माणसाचे जिवण बदलण्याचं सामर्थ्य असतं . त्यासाठीच मुलांनी सतसंग भजन किर्तन ऐकले पाहिजेत व त्यासाठी ती मंदिरात नाही जाऊ शकणार पण जे हरीनाम सप्ताह हरीपाठ भजन गायन किर्तने देवालयात होतात ती आयोजक ग्रामस्थांनी विद्यालयात , शाळा कॉलेजांनी सायं ४ ते ६ ठेवायला हवीत जेणे करून मुलांच्या कानावर हे संतविचार भजन गायन पडेल . सप्ताहात गावोगावी भजन गायन हरीपाठासाठी खास आळंदीहून भाड्याने आणलेली विदर्भ मराठवाड्यातील लहान लहान पोरं कशी गातात , हरीपाठ व गायनाच्या साथीत कसे सात्वीक नाचतात , हे दिसेल -कळेल . हरीपाठ वा भजन म्हणताना ती मुले कशी तल्लीन देवासी एकरूप होतात व त्यावेळी त्यांना जगातले कोणतेही दुख : अडचण आठवत नाहीत ,त्यावेळी त्यांचे मन बुद्धी चित्त स्थिर एकाग्र शांत पवित्र होते व त्यांचेतच देव साकारतो . आत्मा हाच परमेश्वर ! म्हणून गावोगावी किर्तने ही मुलांसमोर शाळा कॉलेजांनी आयोजीत करावीत अशी मिडगुले यांची आग्रही भूमिका व सगळी कडे मागणी आहे .