भर रस्त्यावर मधोमध ही वाहने प्रवासी भरण्याकरिता उभी असतात.यामुळे पुणे नगर रोडवरील केसनंद फाटा येथे वाहतूक कोंडी होताना दिसून येते. रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत .बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना शासनाच्या बसमध्ये चढण्याकरिता या रिक्षा धारकांमुळे मोठी अडचण निर्माण होते .अशा बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षावाले प्रसंगी अरे रावीची भाषाही करताना दिसून येतात. तर तुमची पोलीस प्रशासनास तक्रार करू असे प्रवाशांनी बोलल्यास कुठल्या पोलीस चौकीत जायचे बोला असे उलट प्रश्न प्रवाशांना खाजगी प्रवासी वाहतूकदार व रिक्षा वाले करत आहे. तसेच आम्ही रोड टॅक्स देतो आम्ही रस्त्यावरच वाहने उभी करणार अशी भाषा प्रवाशांना वापरली जाते.
