पालक म्हणतात रडाय लागल्याव आईनेच खेळणं म्हणून बाळाच्या हाती मोबाईल देवून घाण सवय लावली, शिक्षक सांगतात पालकांचा लाड , पुढारी म्हणतात आम्हाला राजकारणाचा लोड , पोरांकडे लक्ष द्याय वेळ नाय , पत्रकारांचे मते बातम्या न् जाहीराती टारगेट ओके केलं म्हणजे समाज्प्रबोधन झालं, व पत्रकारांचे थोर नेते बोलतात , आम्हीच मोबाईल मध्ये असतो तर नातवांना कसे रोकणार ? एकूण मोबाईलातीरेकाचा आगडोंब विझवायला चिमणीच्या शर्थीनेही प्रयत्न करायची कुणाची मानसीकता नाही . मोबाईलच्या प्रचंड गैरवापराने शहरी भागात १३ % मुलांची डोकी हँग झालीत व ९९% लोक हजारोंचे महीना बिल भरून हळूहळू भिकारी होताहेत याचं दुखः नाही ? ७-८ जण idea वापरून ‘जियो ‘ अमिष दावून सर्रास लुटमार होतेय कुणाला खेद नाही . टीव्ही मोबाईलमुळे ५ वर्षाच्या मुलाला चष्मा लागतोय , मग त्या स्फुर्ती गिताप्रमाणे भारत बलसागर महासता कधी कसा होणार , असा प्रश्न मिडगुले यांनी उपस्थीत केला . मुख्याध्यापक तासगाव कर यांचे हस्ते हभप मिडगुले यांचा सत्कार करणेत आला.

