जीवनामध्ये अनेक प्रकारचे खडतर अडचणींना सामोरे जात पवार यांनी आपली राजकीय कारकीर्द मोठी उभी केली, त्यांच्यामुळे समाजातील अनेक घटकांना, तसेच राष्ट्रवादी पक्षाला मोठे पाठबळ मिळाले, घोडगंगा तसेच व्यंकटेश या दोन सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला,
त्यांना राजकीय वारसा तीर्थरूप वडील रावसाहेब दादा पवार यांचा लाभला असून समाजामध्ये विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशोक पवार यांनी राजकारणामध्ये सुरुवातीपासूनच सक्रिय सहभाग घेतला होता, प्रथम ते शिरूर तालुक्या मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते, त्यानंतर लगेच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी नंतर अध्यक्षपदावर विराजमान झाले, जुन्या काळातील राजकारणामध्ये चाणक्य म्हणून समजले जाणारे शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे राजकारणात मोठे यश मिळवण्यामध्ये अशोक बापू पवार यांनी आपला ठसा उमटवला,
मतदारसंघांमध्ये विकास काम म्हटले की, आमदार अशोक बापू पवार अशी त्यांची ख्याती आहे, त्यांनी विज्ञान विभागाची पदवीधर म्हणून तसेच शेतीविषयक तंत्रज्ञान, त्याचप्रमाणे वकिलीची डिग्री, असे शिक्षण घेतलेले आहे, त्यांनी दोन वेळा शिरूर हवेलीचे आमदार म्हणून जनतेची सेवा केलेली आहे, त्यांनी समाजामधील कोणत्याही स्तराचे कार्य हाती घेतले तरी त्यामध्ये आधुनिकता,अभ्यास, आणि व्यवस्थापन करून ते कार्य पूर्णत्वास नेण्यास त्यांचा कायम प्रयत्न असतो, त्यांनी केलेल्या कामांमुळे राज्यभर त्यांची चर्चा आहे,
आमदार पवार यांनी आपल्या कार्यामध्ये तसेच कामांमध्ये दोन्ही तालुक्यांमध्ये रेशनिंग चे बायोटेक पद्धतीने वाटप केले, घरगुती व शेती तसेच उद्योग व्यवसायासाठी योग्य पद्धतीने वीज व्यवस्थापन केले, गोरगरिबांसाठी आरोग्य सेवा, गावोगावी शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारले, शासनाच्या निधीचे योग्य वापर करून विकास कामे मार्गी लावली, नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी थेट संपर्क योजना राबवण्यात आली, ह्या सर्व कामांची रेलचेल पाहून शिरूर आणि हवेली तालुक्यातील नागरिकांनी व मतदारांनी मतदार संघाचे आमदार म्हणून अशोक बापू पवार यांची कायम पसंती जाहीर केली,
अशा या जनतेशी कायम संपर्कात असणाऱ्या, जनतेची अडीअडचण जाणून घेणाऱ्या विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे, हे म्हणजे आमदार पवार यांच्या कामाची पोहोच पावती आहे, शांत मनमिळाऊ स्वभाव 24 तास जनतेच्या संपर्कात, नागरिक, पत्रकार असो वा लहान असो वा मोठा, केव्हाही – कधीही संपर्क करा अथवा फोन करा जनतेच्या सेवेत हजर असे देवाच्या रूपातील व्यक्तिमत्व जनतेला लाभलेले आहे,
आगामी विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली असून शिरूर हवेली विधानसभा मतदार संघामध्ये आता चर्चेला उधाण आले असून भावी आमदार कोण याविषयी गावागावांमधील गाव कट्ट्यावरील तसेच चौका चौकामध्ये चर्चा रंगू लागली आहे, त्यामध्ये बऱ्याच जणांच्या तोंडून आमदार अशोक बापू पवार यांचे नाव समोर येत आहे,
गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांनी आपल्या कारकिर्दीत विकास कामांचा डोंगरच उभा केला आहे, विकास कामांच्या बाबतीत पवार यांचा कोणचा हात धरू शकत नाही, विशेषता शिरूर हवेली मध्ये गावागावांमध्ये जोडणारे रस्ते, शुद्ध पेयजल योजना, अंत्यविधी दशक्रिया ठिकाने, व्यायाम शाळा, जिल्हा परिषद शाळा, व इतर अनेक कामांच्या विकासासाठी अगदी वाड्यावस्त्यांपर्यंत भरगोस निधी टाकून विकास कामांची रेलचेल मोठी दिसत आहे,
सत्ता नसतानाही विरोधी बाजूस बसून आमदार पवार यांनी शिरूर हवेली मतदारसंघांमध्ये विकास कामांमध्ये कुठल्याच प्रकारची कसर केलेली नाही, त्यामुळे या भागातील जनता आमदार पवार यांना कार्यसम्राट या नावाने ओळखत आहेत व प्रसिद्ध देत आहेत, हा पवार यांचा मोठेपणाच म्हणायला हवा, गरीब, शांत, संयमी, कष्टाळू, प्रसंगावधान, निर्णय क्षमता या महत्त्वपूर्ण गुणांमुळे आमदार अशोक बापू पवार यांनी जनतेच्या मनामध्ये जागा केलेली आहे, अशा चर्चेला सध्या शिरूर हवेली मतदारसंघात चर्चेला उधाण आले असून भावी आमदार म्हणून अशोक बापू पवार यांची निवड होणार अशी चर्चा सद्यस्थितीत गावागावांमध्ये रंग धरू लागली आहे,
